महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने जोर धरला असून, हवामान खात्याने राज्यातील अनेक भागांसाठी वादळी पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पावसाची शक्यता आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये केवळ १८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, सध्याच्या साठ्यावर अवलंबून राहिल्यास जुलै अखेरपर्यंतच पुरवठा शक्य आहे.
मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महापालिकेसमोरील ऑलिम्पिया कॅफेला भेट दिली आणि आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी चहा आणि नाश्त्याचा आस्वाद घेतला आणि कॅफे मालकांशी गप्पा मारल्या.
एनआयएने मुंबई विमानतळावरुन दोन दहशतवाद्यांना आज शनिवारी सकाळी अटक केली. त्यांचा आयएसआयएसशी थेट संबंध असल्याचे उघडकीस आले आहे. तसेच पुण्यातील आयईडी प्रकरणाशीही संबंध आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकात अनेक राजकीय गौप्यस्फोट केले आहेत. आज सायंकाळी या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. त्यावेळीही काही खुलासे होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत संविधान, लोकशाही आणि महाराष्ट्र धर्म रक्षणासाठी दोन्ही पक्ष एकत्र येण्यावर चर्चा झाली.