महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS अधिकारी अदिबा अनमने यूपीएससी परीक्षेत १४२ वा क्रमांक मिळवला. ऑटो रिक्षाचालकाची मुलगी असलेल्या अदिबाने दोन वेळा अपयशानंतरही हार मानली नाही आणि तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवले.
पुणे जिल्ह्यातील वर्वंड गावातील शेतकरी सागर शिंदे यांनी जपानच्या प्रसिद्ध मियाझाकी आंब्याची यशस्वी लागवड केली आहे. 'एग ऑफ द सन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आंब्याला देश-विदेशातून मागणी वाढली.
पाकिस्तानी सिनेटर पलवाशा महंमद झई खान यांनी बाबरीची वीट पुन्हा ठेवण्याची भाषा केली केली. त्यावर अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी तुमचा बाप हिंदुस्तानात बसला आहे, असे म्हटले आहे.
मुंबईचा सागरी किनारा रस्ता प्रकल्पात मे महिन्यात आणखी तीन आंतरमार्गिका खुल्या होणार आहेत. दक्षिण मुंबई ते दहिसर प्रवास जलद आणि सुलभ होणार असून, नरिमन पॉइंट ते वांद्रे-वरळी सी लिंक दरम्यान वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
एकनाथ शिंदे यांनी 'मिशन महापालिका' सुरू करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला जोरदार हादरा दिला आहे. कोकणापासून ते मुंबईपर्यंत अनेक माजी नगरसेवक आणि शाखा प्रमुखांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे.