मुंबई - वर्ल्ड जिओ सेंटर येथे सुरू झालेल्या वेव्हज् संमेलनाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या भारत पॅव्हेलियन, महाराष्ट्र पॅव्हेलियन आणि गेमिंग आर्केडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली.
महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS अधिकारी अदिबा अनमने यूपीएससी परीक्षेत १४२ वा क्रमांक मिळवला. ऑटो रिक्षाचालकाची मुलगी असलेल्या अदिबाने दोन वेळा अपयशानंतरही हार मानली नाही आणि तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवले.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र टीका केली आहे. राऊत यांनी देशातील सुरक्षा स्थिती, दहशतवादी हल्ले, आणि त्या पार्श्वभूमीवर मोदींच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (२ मे) ८,९०० कोटी रुपयांच्या विझिंजम आंतरराष्ट्रीय खोल पाण्याच्या बहुउद्देशीय बंदराचे उद्घाटन केले. भारताच्या सागरी पायाभूत सुविधांमध्ये परिवर्तन घडवणारा हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे.
पाकिस्तानी सिनेटर पलवाशा महंमद झई खान यांनी बाबरीची वीट पुन्हा ठेवण्याची भाषा केली केली. त्यावर अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी तुमचा बाप हिंदुस्तानात बसला आहे, असे म्हटले आहे.
विझिंजम बंदर देशाला समर्पित करण्यासाठी आता काही तास उरले आहेत. रात्री साडेसातच्या सुमारास पंतप्रधानांचे विमान तिरुवनंतपुरम येथे पोहोचले.
उत्तराखंडमधील श्री केदारनाथ धामची दारे शुक्रवारी सकाळी ७ वाजता भाविकांसाठी खुली झाली. यावेळी उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी भाविकांचे स्वागत केले. भारतीय सैन्याच्या बँडने भक्तीगीते वाजवली.
भू-राजकीय तणाव आणि जागतिक मंदी असूनही, २०२५ च्या पहिल्या चार महिन्यांत मुंबईच्या मालमत्ता नोंदणीने नवे उच्चांक गाठले आहेत. जानेवारी ते एप्रिल २०२५ मध्ये मुंबईत मालमत्ता नोंदणीतून मिळालेले एकूण महसूल आणि एकूण नोंदणी विक्रमी उच्चांकावर होती.
संत्र्याचा रस जितका चविष्ट तितकाच आरोग्यदायी. यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व-अ, जीवनसत्त्व-ब, जीवनसत्त्व-क, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट असतात. ज्याचे सेवन शरीराला अनेक आजारांपासून वाचवण्यास मदत करते.