मॉडिफिकेशन केलेले ट्रॅक्टर आणि मर्सिडीज-बेंझ जी-वॅगनसारख्या आलिशान कारमधून शेतकरी आंदोलनासाठी उतरले आहेत. यावर नेटकऱ्यांकडून वेगवेगळे प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत.
भारत देशाची अर्थव्यवस्था ही सध्या जगातील सर्वात जलदगतीने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आयएमएफसह (IMF) कित्येक मोठ्या संस्था भारताच्या सर्वोच्च विकास दरासंदर्भात सकारात्मक आहेत.
पिकांसाठी किमान आधारभूत किंमत देणारा कायदा तयार करण्यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. सर्व शेतपिकांसाठी किमान आधारभूत किंमत देण्यासाठी जवळजवळ 10 लाख कोटी रुपयांचा खर्च येऊ शकतो.
शेतकऱ्यांच्या पिकांसाठी किमान आधारभूत किंमत देणारा कायदा (MSP) तयार करण्यासह अन्य मागण्यांवरुन आज शेतकऱ्यांचे ‘दिल्ली चलो’ आंदोलन सुरू झाले आहे. शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी राज्याच्या सीमारेषांवर कठोर सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा 22 जानेवारीला पार पडला. पण रामललांची मूर्ती तयार करणारे अरुण योगीराज आज घरोघरी पोहोचले आहेत. अरुण योगीराज यांनी एशियानेट न्यूजला विशेष मुलाखत दिली आहे.
सध्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू रवींद्र जडेजा त्याच्या वडिलांनी लावलेल्या आरोपांमुळे चर्चेत आहे. अशातच क्रिकेटरच्या पत्नीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
भारताचे आठ माजी नौसैनिक मायदेशीर परतले आहेत. या नौसैनिकांना कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
दिल्लीतील एम्स रुग्णालय आता ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णांसाठी भारतातील संगीताच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करणार आहेत. खरंतर, ही म्युझिक थेरपी काय आहे याबद्दल एम्सच्या न्यूरोलॉजी विभागाच्या प्रोफेसर डॉ. दीप्ति विभा यांनी अधिक माहिती दिली आहे.
शेतकऱ्यांच्या 'दिल्ली चलो' आंदोलनामुळे दिल्ली पोलीस हाय अॅलर्टवर आहे. दिल्लीच्या सर्व सीमेवर कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. याशिवाय हरियाणातील सात जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये गेल्या आठवड्यात साधुच्या वेषात आलेल्या मुलाने आपणच 20 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेलो तुमचा मुलगा असल्याचे एका परिवाराला सांगितले. घरातील मंडळी बेपत्ता झालेल्या आपल्या मुलाला पुन्हा पाहिल्याने आनंदित झाले होते.