मे महिन्याची सुरुवात नागरिकांसाठी अत्यंत सुखकर झाली आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात आजपासून बदल करण्यात आले आहेत. आज बुधवार पासून एलपीजी सिलिंडरचे दर 19 रुपयांनी कमी झाले आहेत.केवळ व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर कमी करण्यात आले आहेत.
बुधवारी सकाळी दिल्ली आणि एनसीआरच्या अनेक शाळांमध्ये बॉम्ब असल्याचा कॉल पोलिसांना आला.त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच सर्वत्र सर्च ऑपेरेशनला सुरुवात केली आहे. यावेळी अनेक शाळेतील परिसर देखील रिकामा करण्यात आला होता
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये दहा दशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.
सुषमा स्वराज यांची कन्या बासुरी स्वराज यांनी आज दिल्लीयेथे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल आहे. यामध्ये त्यांनी संपत्तीची देखील घोषणा केली असून शैक्षणिक कागदपत्रे देखील दिली आहे. बांसुरी स्वराज यांनी आपले बहुतांश शिक्षण यूकेमधून केले आहे.
व्हाइस ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांची नौदलाचे नवे प्रमुख म्हणून निवड झाली आहे. तर त्यांनी 1 जुलै 1985 रोजी ते नौदलात रुजू झाले झालेत. दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षेत्रात त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे.
दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी खासदार राघव चड्डा हे डोळ्यावरील ऑपरेशनसाठी लंडनला गेले असल्याचे सांगितले असून त्याबाबत त्यांनी विधान केले आहे.
शत्रुघ्न सिन्हा आणि राजेश खन्ना यांच्यात लोकसभा निवडणुकीवरून भांडण झाले होते, हे कशामुळे झाले नेमके समजून घेऊयात.
गुजरात राज्यातील विरोधी पक्षनेते अर्जुन मोधवाढिया यांनी नरेंद्र मोदी हे विरोधी म्हणण्याला प्राधान्य देत असल्याचे म्हटले होते.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून यामध्ये रोहित शर्मा कर्णधार आणि हार्दिक पांड्या उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.
सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अनेक नेते मंडळी आपले उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांच्या संपत्तीची घोषणा करत आहे. अशातच अमेठीमधून स्मृती इराणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांनी संपत्ती देखील घोषित केली आहे.