बलूचिस्तानच्या निर्वासित पंतप्रधान नायला कादरी यांनी पाकिस्तानवर बलूचिस्तानवर कब्जा केल्याचा आरोप केला आहे आणि भारताचे कौतुक केले आहे. त्यांनी पाकिस्तानवर मुसलमानांच्या हत्येचाही आरोप केला आहे.
इस्लामाबाद - बलूचिस्तानला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संघर्ष करणाऱ्या नायला कादरी म्हणाल्या आहेत की बलूचिस्तानवर कब्जा करण्यात आला आहे. बलूचिस्तान स्वतंत्र होत आहे. त्या म्हणाल्या आहेत की भारतातील लोक खूप भाग्यवान आहेत. नायला कादरी निर्वासित बलूच सरकारच्या पंतप्रधान आहेत. त्या कॅनडामध्ये राहतात. त्यांनी २१ मार्च २०२२ रोजी युरोपमधील एका ठिकाणी निर्वासित बलूच सरकारची स्थापना केली होती.
नायला कादरी म्हणाल्या, "हिंदुस्तानात राहणाऱ्या ज्या लोकांना पाकिस्तानवर प्रेम आहे त्यांना पाकिस्तानची माहिती नाही. त्यांनी फक्त त्या लोकांना भेटायला हवे जे याच प्रेमामुळे १९४७ मध्ये हिंदुस्तान सोडून पाकिस्तानला गेले होते. ७५ वर्षांपासून ते महाजिर आहेत. त्यांना तिथे हिंदुस्तानी म्हणतात. त्यांना कोणी पाकिस्तानी मानतच नाही. जे आपले सर्वस्व सोडून गेले, पाकिस्तानच्या प्रेमात, पाकिस्तानने त्यांना हिंदुस्तानी महाजिर हा किताब दिला आहे. त्यांना मारतात, कापतात, छळ करतात, त्यांच्या मुली उचलून नेतात. त्यांना पाकिस्तानात काही मान मिळालाच नाही. ते तुम्हाला आपला भाऊ समजत नाहीत, आपल्या बरोबरीचे समजत नाहीत."
जितके मुसलमान पाकिस्तानने मारले तितके कोणीही नाही मारले
नायला कादरी म्हणाल्या, "जगातील जितके मुसलमान पाकिस्तानने मारले तितके कोणीही नाही मारले. झिया-उल-हक जेव्हा सैन्यात होता, तेव्हा त्याने १० हजार पॅलेस्टिनी एका रात्रीत मारले. पैसे जिथे मिळतील तिथे पाकिस्तानचे सैन्य जाते. दोन लाख लोकांना हे बलूचिस्तानात मारून टाकले आहेत. बांगलादेशात ३० लाख लोकांना मारून टाकले आहेत. यातील बहुतेक मुसलमान होते. हे अफगाणिस्तानात ४ लाख लोक मारून टाकले आहेत."
त्या म्हणाल्या, "भारतातील लोक भाग्यवान आहेत की त्यांच्याकडे भारतसारखा देश आहे. त्याची कदर करा. लोकांनी रक्त सांडून तो स्वतंत्र केला आहे. हा नेताजी सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांचा देश आहे. हा शिवाजी महाराजांचा देश आहे. तुम्ही त्याचा आदर करा."