या सामन्यातील विजेता संघ 3 जून रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा सामना करणार आहे.
मुंबई - श्रेयस अय्यरच्या नाबाद ८७ धावांच्या बळावर पंजाब किंग्जची टीम फायनलमध्ये पोहोचली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सला ५ गडी राखून हरवले. त्यामुळे आता ३ जून रोजी रॉयल चॅलेंजर बंगळुरु यांच्यासोबत पंजाब किंग्जचा सामना होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
यापूर्वी २०१४ मध्ये पंजाब किंग्जची टीम आयपीएल फायनलमध्ये पोहोचली होती. त्यावेळी कोलकाता नाईट रायडर्ससोबत त्यांचा मुकाबला झाला होता. हा सामना कोलकता नाईड रायडर्सनी जिंकला होता. आता २०२५ मध्ये पंजाब किंग्जला आयपीएल चषकावर नाव कोरण्याची संधी प्राप्त झाली आहे.
पंजाब संघाने आजच्या मॅचचा टॉस जिंकला. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, मुंबई इडियन्सने पंजाब किंग्जला जिंकण्यासाठी २०४ धावांचे टार्गेट दिले होते.
आयपीएल 2025 च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्सला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला, कारण संघाचा प्रमुख फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा अवघ्या ८ धावांवर झेलबाद झाला. मुंबई आणि पंजाब किंग्ज यांच्यात रंगलेल्या या अत्यंत महत्त्वपूर्ण सामन्यात दुसऱ्याच षटकात रोहितला जीवदान मिळालं होतं, पण तो ते फार काळ टिकवू शकला नाही. त्याच्यानंतर जॉनी बेअरस्टोही आऊट झाला. दरम्यान, ४४ धावा करुन सूर्यकुमार यादवही झेलबाद झाला. त्यामुळे मुंबई इंडियन्सला तिसरा धक्का बसला आहे. तिलक वर्माही झेलबाद झाला असून त्याने एकूण ४४ धावा केल्या. हार्दिक पांड्या ३६ धावांवर झेलबाद झाला. मुंबई इंडियन्सला सहावा धक्का बसला असून नमन धीर ३७ धावांवर झेलबाद झाला. मुंबई इंडियन्सने २० षटकांमध्ये २०३ धावा केल्या. त्यामुळे जिंकण्यासाठी पंजाब किंग्जला २०४ धावांचे टार्गेट मिळाले होते.
क्वालिफायर सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सने दिलेलं लक्ष्य पंजाब किंग्जने केवळ १९ षटकांत पूर्ण करत फायनलच्या दिशेने दमदार पाऊल टाकलं. सामन्याची सुरुवात पंजाबसाठी काहीशी धडकी भरवणारी होती, पण कर्णधार श्रेयस अय्यरच्या संयमी आणि प्रेरणादायी फलंदाजीमुळे पंजाबने सामना आपल्या बाजूने वळवला.
प्रथम फलंदाजी करताना मुंबईने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात खालावलेली होती. सलामीवीर प्रभसिमरन सिंग केवळ ६ धावा करत बाद झाला, तर त्याच्या साथीदार प्रियांश आर्यने दमदार सुरुवात करत १० चेंडूंमध्ये २० धावा केल्या, मात्र तोही लवकरच माघारी परतला. अशा स्थितीत संघ अडचणीत सापडला होता.
मात्र जोश इंग्लिस (२१ चेंडूंमध्ये ३८ धावा) आणि निहार वढेरा (२९ चेंडूंमध्ये ४८ धावा) यांनी डाव सावरला. त्यांनी संयम राखून आणि योग्य संधी साधून फलंदाजी केली, ज्यामुळे पंजाबच्या डावाला स्थैर्य प्राप्त झालं. या दोघांच्या भागीदारीनंतर अखेरच्या टप्प्यावर कर्णधार श्रेयस अय्यरने जबाबदारीचं प्रदर्शन करत नाबाद ८७ धावांची शानदार खेळी साकारली.
मार्कस स्टॉयनिसने दुसऱ्या टोकावर शांतपणे साथ दिली आणि अय्यरच्या साथीनं पंजाबचा विजय निश्चित केला. पंजाब किंग्जने १९ व्या षटकातच लक्ष्य गाठत मुंबई इंडियन्सवर निर्णायक विजय मिळवला.
या विजयासह पंजाब किंग्जने आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला असून, संघाचा आत्मविश्वास आणि अय्यरचं नेतृत्व या दोघांमुळे पंजाबचा हा प्रवास संस्मरणीय ठरला आहे.
दोन्ही संघांमधील खेळाडू
पीबीकेएस : प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (क), जोश इंग्लिस (विकेटकीपर), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, अजमतुल्ला ओमरझाई, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, काइल जेमिसन, विजयकुमार विशाख
MI : रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पांड्या (क), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लीसन, अश्वनी कुमार
पंजाब किंग्स संघ: प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, जोश इंग्लिस (डब्ल्यू), श्रेयस अय्यर (क), नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, अजमातुल्ला ओमरझाई, हरप्रीत ब्रार, काइल जेमिसन, अर्शदीप सिंग, मुशीर नौशाद खान, विजयकुमार, सुर्वे दुय्यम, सुर्वे, बार्शे, बार्शे वीरेश शेडगे, युझवेंद्र चहल, विष्णू विनोद, यश ठाकूर, आरोन हार्डी, कुलदीप सेन, मिचेल ओवेन, हरनूर सिंग, पायला अविनाश
मुंबई इंडियन्स संघ: रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (w), सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (क), नमन धीर, मिचेल सँटनर, राज बावा, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लीसन, अश्वनी कुमार, रॉबिन मिंज, रघु शर्मा, कृष्णन शर्मा, दीप शर्मा, कृष्णन चॅले, दीप शर्मा, कृष्णन चॅलेंज, राज बावा. असलंका, मुजीब उर रहमान, अर्जुन तेंडुलकर, बेव्हॉन जेकब्स, सत्यनारायण राजू