India Pakistan Ceasefire : संजय राऊत यांनी दावा केला की, भारत-पाकिस्तानदरम्यान डोनाल्ड ट्रंम्प यांनी हस्तक्षेप करणे म्हणजे मोदी सरकार कमजोर आहे. खरंतर, आपल्या देशाच्या मुद्द्यांमध्ये तिसऱ्या राष्ट्राध्यक्ष हस्तक्षेप करू शकत नाही.
Sanjay Raut on Donald Trump India Pakistan War : भारत आणि पाकिस्तान युद्धाला पूर्णविराम दिल्याचे श्रेय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांनी घेतले आहे. यावर आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. संजय राऊत यांनी म्हटले की, राष्ट्राध्यक्ष ट्रंम्प ताकदवान आहेत तर इज्राइल आणि गाझामध्ये दीर्घकाळ चालणारे युद्ध का थांबवत नाहीयेत?
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत पुढे म्हटले की, ट्रंम्प भारतावर दबाव टाकत पाकिस्तानासोबत होणारे युद्ध थांबवतात. आपण एक सार्वभौम देश आहे. आपण असा एक देश आहे, ज्यामध्ये तिसरा कोणताही राष्ट्राध्यक्ष हस्तक्षेप करू शकत नाही. हा आपल्या सार्वभौमत्वावर हल्ला आहे आणि मोदी सरकारची हीच कमजोरी आहे की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना हस्तक्षेप करावा लागला."
ट्रंम्प यांनी का थांबवले युद्ध?
डोनाल्ड ट्रंम्प यांना युद्ध थांबवण्याची काय गरज असा सवाल राऊत यांनी विचारला आहे. आपल्या 26 माता-भगिनींचे सिंदूर दहशतवाद्यांनी आणि पाकिस्तान्यांनी पुसले. यामुळेच आपण ऑपरेशन सिंदूर केले. कारण त्यांनी आपल्या सिंदूर, आपल्या संस्कृतीचा अपमान केला होता.
केंद्र सरकारवर निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला पुन्हा निशाण्यावर धरत संजय राऊत यांनी म्हटले की, आता मोदी सरकारने सांगावे की त्यांनी कोणता नक्की बदला घेतला आहे. काश्मीरमध्ये घुसलेले ते 6 दहशतवादी आजही आपल्या देशात लपून बसले आहेत. आपण त्यांचा अद्याप खात्मा केलेला नाही.
सर्वपक्षीय बैठक बोलवा
संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती केली आहे की, त्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. यामध्ये पंतप्रधानांनी देखील सहभागी व्हावे आणि सर्व माहिती द्यावी. संजय राऊत यांनी दावा केला की, "मोदी सरकारने आपल्या सैनिकांचे मनोबल कमी केले आहे. कोणता बदला घेतलाय हे सांगावे. कोणत्याही देशाने समर्थन केले नाही, हे कोणाचे अपयश आहे. त्यांचे शब्द होते, पाकिस्तानचे तुकडे करू, पूर्ण बदला घेऊ. आता काय झाले. नुकसान तर भारत आणि जम्मू-काश्मीरचे झाले आहे."
इंदिरा गांधींचा उल्लेख
पत्रकार परिषदेत राऊत यांनी इंदिरा गांधी यांचा उल्लेख करत म्हटले की,"इंदिरा गांधी यांनी अमेरिकेचे ऐकले नव्हते. वर्ष 1971 मध्ये पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते. 90 हजार पाकिस्तान सैन्याने भारतासमोर शरणागती स्विकारली होती."