पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या पावसाची शक्यता असून आकाश अंशतः ढगाळ राहील. त्याचबरोबर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.
पुण्यातील बाॅलर पबसह १४ पब, बारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई केली. उत्पादन शुल्क विभागाने मुंढवा, कल्याणीनगर आणि कोरेगाव पार्क भागातील पब आणि बारवर कारवाई सुरू केल्याने या भागात शुकशुकाट असल्याचे दिसून येत आहे.
लिहून घ्या, उत्तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सहाच्या सहा जागा विजय होतील. महायुतीच्या सर्वात जास्त जागा महाराष्ट्रातून निवडून येतील", असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.
सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील आंदोलन दडपण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला असून यामुळे घटनास्थळावरील शेतकरी संतप्त झाले आहेत. येथे पोलिसांनी काही शेतकऱ्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला आहे.
नाशिकमध्ये प्राप्तिकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 26 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे नाशकात एकच खळबळ उडाली आहे.
उन्हामुळे धरणामधील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे. त्यातच काटेपूर्णा धरणामध्ये केवळ १७.९० टक्के जलसाठा आहे. त्या पार्श्वभूमीवक
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आषाढी वारी संदर्भात पूर्वतयारी आढावा बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
मनोज जरांगे पाटलांनी परत आता चार तारखेला आंदोलनाचा इशारा दिला असून मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या दडपशाहीला बळी पडून सरकारने सगेसोयरेंबाबतचा निर्णय घेतला तर, ओबीसी समाज रस्तावर उतरेल, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक १० जूनला जाहीर करण्यात आली होती. परंतु ती दहा दिवसांपूर्वीच पुढे ढकलण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावीचा निकाल 27 मे ला जाहीर करणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली.