राज्यात आगामी विधानसभा निवडणूक नोव्हेंबर ऐवजी डिसेंबरमध्ये होण्याची शक्यताय. यामागे 'लाडकी बहीण' योजनेचा प्रचार करण्यासाठी वेळ मिळावा, हा उद्देश असल्याचे बोलले जात आहे. डिसेंबरमध्ये निवडणूक झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांना सुनियोजित पद्धतीने देवेंद्र फडणवीस आणि मला अटक करायची होती, असे ते म्हणाले.
अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत नारायणगावात काळे झेंडे दाखवण्यात आले. तर, श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडेंनी मराठ्यांनी आरक्षण मागितले पाहिजे का असा प्रश्न उपस्थित केलाय. तसेच, बेंगळुरूमध्ये एका तरुणीवर ऑटोचालकाने बलात्कार केल्याची घटना घडली.
श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी मराठ्यांनी आरक्षण मागितले पाहिजे का असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात 25 ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्यात बंद पाळण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
मनोज जरांगे पाटील यांच्या नाशिकमधील शांतता रॅलीवरून छगन भुजबळ यांनी जोरदार टीका केली आहे. जरांगेंकडे आता कोणी लक्ष देत नाही असा दावा भुजबळांनी केला आहे. तसेच, जरांगेंनी 288 जागा लढवाव्यात आणि मुख्यमंत्री व्हावे असा टोलाही त्यांनी लगावला.