पुण्यातील विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या नावाचा उल्लेख एका आर्थिक गैरव्यवहाराच्या संदर्भात समोर आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
पुणे | प्रतिनिधी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांविरोधातील आरोपांचे प्रकरण चिघळू लागत असतानाच, पुण्यातील विशेष पोलिस महानिरीक्षक (IG) जालिंदर सुपेकर यांच्या नावाचा उल्लेख झाल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट कारवाईचा इशारा दिला असून, कोणालाही पाठीशी घालणार नाही, असा स्पष्ट संदेश दिला आहे.
राजकारण, पोलीस यंत्रणा आणि प्रशासन यांच्यातील संबंधांचं जाळं उलगडण्याच संकेत म्हणून ही घटना म्हणून पाहिली जात आहे. जालिंदर सुपेकर यांचे नाव एका आर्थिक गैरव्यवहाराच्या संदर्भात समोर आल्याने, अनेकांचे भुवया उंचावल्या. या प्रकरणात कुणाचाही बचाव केला जाणार नाही, हे अजित पवार यांनी आज स्पष्ट केलं.
या प्रकरणाने केवळ एकाच अधिकाऱ्यावर नव्हे, तर संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलीस व्यवस्थेतील अधिकारी जर अशा स्वरूपाच्या प्रकरणात अडकले, तर सामान्य जनतेच्या विश्वासाचे काय? हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
या सगळ्या गोष्टींना या प्रकरणामुळे पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे. अजित पवारांचा "क्षमा नाही" हा इशारा केवळ भाषिक गूंज न ठरता, कृतीत उतरतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. राज्यातील पोलीस दलात पारदर्शकता आणि जबाबदारी टिकवण्याची ही एक चाचणीच ठरू शकते.