उन्हाळ्यात अॅसिडिटीपासून सुटका हवीय?, 'या' 7 आयुर्वेदिक टिप्स नक्की फॉलो करा!
जिरे-धणे, बडीशेप-कोथिंबीर पाणी, नारळ पाणी, ओवा-गूळ आणि दही हे पचनासाठी उत्तम उपाय आहेत. हे नैसर्गिकरित्या ॲसिडिटी आणि गॅस कमी करतात, तसेच पचनक्रिया सुधारतात.
- FB
- TW
- Linkdin
Follow Us
)
जिरे आणि धणे पाणी, पचनसंस्थेचा नैसर्गिक टॉनिक
जिरे आणि धणे दोन्ही आरोग्यासाठी अमूल्य घटक आहेत. यांचे पाणी पचायला हलके असून अॅसिडिटी, गॅस आणि पोटदुखीसारख्या त्रासांवर प्रभावी उपाय ठरते. रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास हे पाणी प्यायल्यास पोटाला थंडावा मिळतो आणि पचनक्रिया सुरळीत होते.
बडीशेप आणि कोथिंबीर पाणी, तोंडाची व पोटाची दुहेरी काळजी
बडीशेप हे पाचन सुधारण्यासाठी प्रसिद्ध आहे तर कोथिंबीर थंडावा देते. या दोघांचे पाणी उन्हाळ्यात विशेष फायदेशीर ठरते. अॅसिडिटी, पोट फुगणे आणि अपचनाच्या त्रासांपासून आराम मिळवण्यासाठी हे पाणी दररोज प्या. चवही छान आणि आरोग्यास उपयुक्त!
नारळ पाणी, नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट आणि थंडावा
नारळ पाणी केवळ तहान भागवत नाही, तर ते पचनसंस्थेला शांत करतं. त्यातील नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स आणि क्षारीय गुणधर्मांमुळे अॅसिडिटी दूर होते. उन्हाळ्यात रोज एक नारळ पाणी पिल्याने शरीरात थंडावा टिकून राहतो आणि आम्लपित्त नियंत्रित राहतं.
ओवा आणि गूळ, गॅस आणि आम्लता यावर पारंपरिक उपाय
ओवा आणि गूळ यांचे मिश्रण पचनासाठी एक उत्तम घरगुती उपाय आहे. जेवणानंतर 1 चमचा ओवा आणि गूळाचा एक छोटा तुकडा चावून खाल्ल्यास गॅस, अपचन आणि अॅसिडिटीपासून झपाट्याने आराम मिळतो. या उपायाने पोट हलकं वाटतं आणि छातीत होणारी जळजळ कमी होते.
थंडगार दह्याचा आहारात समावेश, पचनसंस्थेसाठी वरदान
दही हे नैसर्गिक प्रोबायोटिक आहे, जे पचनसंस्थेतील चांगल्या बॅक्टेरियांना पोषण देतं. उन्हाळ्यात दह्याचा नियमित आहारात समावेश केल्यास पोट थंड राहतं आणि अॅसिडिटीपासून संरक्षण मिळतं. भातासोबत, रायता किंवा ताकाच्या स्वरूपात दह्याचं सेवन करा.
जेवण वेळेवर आणि प्रमाणात करा, पोटासाठी उत्तम शिस्त
उन्हाळ्यात उशिरा किंवा अति खाणं टाळा. त्यामुळे पचनक्रिया धीम्या होते आणि अॅसिडिटी वाढते. दररोज ठराविक वेळेला जेवण केल्याने शरीराची ‘बायोलॉजिकल क्लॉक’ सुरळीत राहते आणि अन्न पचायला मदत होते. जेवणानंतर लगेच झोप टाळा.
पुरेसे पाणी प्या, अॅसिडिटीसाठी सोप्पा उपाय
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी लवकर कमी होते. त्यामुळे आम्लता वाढू शकते. दररोज किमान ८-१० ग्लास पाणी प्या. लिंबूपाणी, ताक, नारळ पाणी यासारखे नैसर्गिक पेय देखील तुमच्या पाचनक्रियेस पोषक ठरतात आणि अॅसिडिटी दूर ठेवतात.