वजन वाढत असल्यास कोणते डाएट फॉलो करायला हवं?
उन्हाळ्यात वजन वाढतंय? मग भरपूर पाणी पिऊन, फळं खा आणि जंक फूड टाळा! शरीर थंड ठेवण्यासाठी नारळपाणी आणि ताक घ्या.
- FB
- TW
- Linkdin
Follow Us
)
वजन वाढत असल्यास कोणते डाएट फॉलो करायला हवं?
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तापमान प्रचंड वाढतंय. काही भागांमध्ये ४० अंशांच्या पुढे पारा गेला आहे. अशा उष्ण हवामानात शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होऊ लागलं, की डोकेदुखी, चक्कर, थकवा, चिडचिडेपणा आणि डिहायड्रेशनसारखे त्रास सुरू होतात. त्यामुळेच उन्हाळ्यात शरीर थंड ठेवणं आणि योग्य आहार घेणं आवश्यक ठरतं.
पाणी भरपूर प्या
दिवसभरात किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. घामाने शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं, ते भरून काढणं आवश्यक असतं.
नारळपाणी, ताक, लस्सी:
हे पेय नैसर्गिक थंडावा देतात. डिहायड्रेशनपासून वाचवतात आणि पचनक्रियेला मदत करतात.
फळं खा – रस नको
संत्र, कलिंगड, खरबूज, द्राक्षं यासारखी पाण्याचं प्रमाण असलेली फळं खाल्ल्यास शरीर थंड राहतं. रस घेताना साखर टाळावी.
पातळ आहार घ्या
भात, उसळ, भाजी यांसारखा हलका आहार घ्या. भरपूर मसाले, तेलकट पदार्थ टाळा.
कोल्ड्रिंक्स नकोच
तात्पुरता थंडावा मिळतो, पण शरीराचं नैसर्गिक तापमान बिघडतं आणि पचनावर परिणाम होतो.
चहा-कॉफी कमी करा
जास्त चहा, कॉफी पिल्याने शरीरात उष्णता वाढते आणि डिहायड्रेशन होऊ शकतं
जंक फूड टाळा
पिझ्झा, बर्गर, समोसा यासारखे तळलेले पदार्थ शरीर गरम करतात. त्याऐवजी घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ खा.
उन्हात बाहेर जाणं टाळा
दुपारी १२ ते ३ या वेळात घराबाहेर पडू नका. बाहेर जाताना टोपी, सनग्लासेस, पाण्याची बाटली आणि सनस्क्रीन लावा.