भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हवाई हल्ले केले. लष्कर आणि जैशचे मुख्यालय उद्ध्वस्त. दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर राफेलने हल्ला केला.
नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतने बदला घेतला आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हवाई हल्ला करण्यात आला आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार भारताने कुप्रसिद्ध दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयावर हल्ला केला आहे. त्याचबरोबर दहशतवादी मसूद अजहरच्या अड्ड्यांनाही उद्ध्वस्त करण्यात आले आहे.
ऑपरेशन सिंदूरच्या खास गोष्टी
१- ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दल, भारतीय सैन्य आणि भारतीय नौदलाने मिळून काम केले.
२- हल्ल्यासाठी ड्रोनचाही वापर करण्यात आला. राफेल लढाऊ विमानांनी स्कॅल्प क्षेपणास्त्रे डागली.
३- पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑपरेशन सिंदूरवर लक्ष ठेवून होते.
४-सैन्याने म्हटले आहे की सर्व ९ अड्ड्यांवर केलेला हल्ला यशस्वी झाला आहे.
५- मुरीदकेमध्ये दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आले आहे.
६- बहावलपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाला लक्ष्य करण्यात आले.
७- भारताच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनेक देशांतील आपल्या समकक्षांशी चर्चा केली आहे. त्यांना भारताने उचललेल्या पावलांबद्दल माहिती दिली आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबिया, यूएई आणि रशियाचा समावेश आहे.
८- हल्ल्यानंतर लगेचच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी चर्चा केली. त्यांना केलेल्या कारवाईबद्दल माहिती दिली.
९-पाकिस्तानचे उप पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले की भारतीय हवाई दलाने भारतीय हवाई क्षेत्रात राहून, कोणत्याही चिथावणीशिवाय आणि उघडपणे युद्धाची कारवाई करत स्टँडऑफ शस्त्रांचा वापर करून पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केले आहे. मुरीदके आणि बहावलपूरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून आणि कोटली व मुजफ्फराबादमध्ये नियंत्रण रेषा ओलांडून नागरी लोकसंख्येला लक्ष्य केले आहे.
१०-श्रीनगर, जम्मू, अमृतसर, लेह, चंदीगड आणि धर्मशाळा येथून ये-जा करणाऱ्या विमानांवर परिणाम झाला आहे. बीकानेरहून ये-जा करणारी विमानेही प्रभावित झाली आहेत.