ठाण्यातील तीन पोलिसांनी एका जोडप्याकडून ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर तिघांनाही निलंबित करण्यात आले असून, सिसिटीव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्डिंगमुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
ठाणे | प्रतिनिधी पोलिसांवर जनतेचा विश्वास असतो की, ते अन्यायाविरुद्ध लढतील. मात्र ठाण्यात तिघा पोलिसांनीच एका निरपराध जोडप्याकडून ५० हजारांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, यामुळे पोलीस खात्याची प्रतिमा डागाळली आहे. संबंधित तिघांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणात ठाणे शहरातील एका पोलिस स्टेशनचे तीन कर्मचारी आरोपी आहेत. त्यांनी एका तरुण जोडप्याला अडवून "तुमच्यावर कारवाई करू" अशी भीती दाखवत ५० हजार रुपये मागितल्याचा आरोप आहे. यापैकी काही रक्कम त्यांनी उकळल्याचंही प्राथमिक तपासातून स्पष्ट झालं आहे. सज्जनांचे रक्षक की डरावने वसूलदार?
जोडप्याने पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. तातडीने विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आणि त्यानंतर तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पोलीस दलातील शिस्त आणि जनतेचा विश्वास अबाधित राहावा म्हणून ही तातडीची पावले उचलण्यात आली, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सिसिटिव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्डिंग निर्णायक
या प्रकरणात काही सिसिटिव्ही फुटेज आणि फोनवरील संभाषणाच्या रेकॉर्डिंगमुळे पोलिस कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. चौकशीत आरोप निश्चित झाल्याने त्यांना सस्पेंड करण्यात आलं आहे.
विश्वासाला तडा
एकीकडे पोलिस विभाग 'जनतेचा मित्र' होण्यासाठी डिजिटल पोलीसिंग, तत्पर प्रतिसाद यांसारख्या संकल्पनांवर भर देत आहे. मात्र, अशा घटनांमुळे साध्या माणसाला पोलिसांकडे जाण्याची भीती वाटू लागते, ही बाब अधिक गंभीर आहे.
गुन्हेगारांवर काय कारवाई होणार?
निलंबन ही केवळ तात्पुरती कार्यवाही असून, या पोलिसांवर फौजदारी स्वरूपात गुन्हा दाखल केला जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.