सार

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात वाळू वाहतूक प्रकरणात १४ हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक गजानन माळी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. 

यवतमाळ | प्रतिनिधी वाळू वाहतूक प्रकरणात आरोपीस मदत करण्यासाठी १४ हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक गजानन माळी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. ही कारवाई यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात करण्यात आली असून, पोलिस खात्यात मोठी खळबळ उडाली आहे.

फारशी चर्चा नको, पैसे द्या आणि विषय मिटवा!

मिळालेल्या माहितीनुसार, एका वाळू वाहतूक प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी गजानन माळी यांनी १४,००० रुपयांची लाच मागितली होती. संबंधित व्यक्तीने ही मागणी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पोहचवली आणि सापळा रचण्यात आला.

रंगेहात पकडताना विश्वास बसणार नाही असा प्रकार ठरलेल्या ठिकाणी पैसे घेत असताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी गजानन माळी यांना अटक केली. हे प्रकरण इतकं स्पष्ट होतं की कोणत्याही अतिरिक्त तपासाशिवाय, पुरावा हातात मिळाला.

पोलीस खात्याच्या प्रतिमेला तडा? 

पोलिस खात्यावर नागरिकांचा विश्वास असावा म्हणून अनेक स्तरांवर प्रयत्न सुरू असताना, अशा घटनांमुळे संपूर्ण यंत्रणेच्या नावलौकिकावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.