जळगाव जिल्ह्यात भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू झाला. पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याच्या अफवेने प्रवाशांनी उड्या मारल्या आणि दुसऱ्या ट्रॅकवर आलेल्या कर्नाटक एक्स्प्रेसच्या धडकेत सापडले.

महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी भीषण रेल्वे अपघात झाला. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. लखनौहून मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे लोकांनी चालत्या ट्रेनमधून उड्या मारायला सुरुवात केली.

काही लोकांनी साखळी ओढून ट्रेन थांबवली. यानंतर मोठ्या संख्येने लोक खाली उतरून दुसऱ्या ट्रॅकवर गेले. दरम्यान, कर्नाटक एक्सप्रेस भरधाव वेगात आली. त्यामुळे रुळांवर उपस्थित लोकांना चिरडले. ट्रेन इतक्या वेगाने आली की लोकांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही.

 

Scroll to load tweet…

 

रुळांवर विखुरले मृतदेह

कर्नाटक एक्स्प्रेस गेल्यानंतर रुळांवर लोकांचे विकृत मृतदेह विखुरले गेले. कुणाची मान कापली गेली तर कुणाच्या शरीराचे अनेक तुकडे झाले. कोणाचे हात पाय कापले गेले. या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.

पुष्पक एक्स्प्रेसच्या एका डब्यात ठिणगी पडली

एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, पुष्पक एक्स्प्रेसच्या डब्यात 'हॉट एक्सल' किंवा 'ब्रेक-बाइंडिंग' (जॅमिंग) झाल्यामुळे स्पार्क झाला. यामुळे प्रवासी भयभीत झाले. पाचोराजवळील परधाडे स्थानकाजवळ हा अपघात झाला. मुंबईपासून पाचोरा 400 किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.

आणखी वाचा : 

पुष्पकला आग लागल्याची अफवा अनेकांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने चिरडून 10 ठार