सार

Siddhant Shirsat Case : राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर करण्यात आलेले गंभीर आरोप संबंधित महिलेने मागे घेतले आहेत. 

Siddhant Shirsat Case : राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर करण्यात आलेले गंभीर आरोप संबंधित महिलेने मागे घेतले असून, हे तिचे “वैयक्तिक प्रकरण” असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. मात्र या आरोप मागे घेण्याच्या निर्णयामागे दबाव आणि धमकी असल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.

अंजली दमानिया यांनी स्पष्ट शब्दांत विचारलं की, “सामाजिक न्याय मंत्री, जे स्वतःच्या घरात न्याय करत नाहीत, ते महाराष्ट्राला काय न्याय मिळवून देतील? हे वैयक्तिक प्रकरण आहे असे ते म्हणूच कसे शकतात?” त्या महिलेवर कथितरीत्या ब्लेडने स्वतःला दुखापत करून, बंदुकीच्या धमकीने लग्नासाठी भाग पाडल्याचं आणि नंतर गर्भपात करायला लावल्याचं आरोप त्यांनी केला. लग्नानंतरही तिच्यावर छळ सुरू राहिला आणि अखेर तिच्यावर दबाव टाकून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला, असा दावा दमानिया यांनी केला आहे.

 

Scroll to load tweet…

 

त्यांचा आणखी आरोप असा होता की, “माझे वडील मंत्री होणार आहेत, ते शिंदे यांचे उजवे हात आहेत” अशा शब्दांत धमकावून ती मुलगी गप्प बसली, आणि आता आरोप मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव आणला गेला. हे सगळं ‘सामाजिक न्याय मंत्र्यांचा न्याय’ आहे का?, असा थेट सवाल करत अंजली दमानिया यांनी ह्या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तात्काळ स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली.

दरम्यान, सदर महिलेने आरोप मागे घेताना एक निवेदन दिलं आहे, ज्यामध्ये तिने स्पष्टपणे म्हटलं आहे की, “हे आमचं वैयक्तिक प्रकरण असून यावर कुणीही राजकारण करू नये. मी शिरसाट साहेबांचा सन्मान करते आणि त्यांनी कधीही मला त्रास दिला नाही. सिद्धांत शिरसाट यांच्यावरील सर्व आरोप मी मागे घेते.” तिने पुढे सांगितलं की, “या प्रकरणावर माझ्या नावावर कुणी राजकारण केलं तर मी कायदेशीर कारवाई करेन.”

तिच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडियावर तिच्या नावाने राजकारण चालवू नये, हे प्रकरण तिला पूर्णतः संपवायचं असून, आयुष्यात पुढे जायचं आहे. तिने आपला निर्णय स्वतंत्रपणे घेतल्याचा पुनरुच्चार केला.

हा संपूर्ण प्रकरण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत असून, अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि महिला संरक्षणाच्या दृष्टीने उभा केलेला मुद्दा गंभीर मानला जात आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत या प्रकरणाला नवा राजकीय कलाटणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.