सार

नागपूरमध्ये २० हजार रुपयांसाठी एका ५ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले. पोलिसांच्या जलद कारवाईमुळे मुलीची सुखरूप सुटका झाली. व्यसनाधीन गुन्हेगाराने खंडणीची मागणी केली होती.

रविवारी नागपूरच्या वर्धा रोड परिसरात घडलेली एक घटना शहराच्या सुरक्षिततेवर आणि माणुसकीच्या सीमारेषांवर गंभीर प्रश्न उपस्थित करते. अवघ्या २० हजार रुपयांसाठी एका व्यसनाधीन गुन्हेगाराने ५ वर्षीय चिमुरडीचं अपहरण करून खंडणीची मागणी केली – पण पोलिसांच्या जलद कारवाईमुळे त्या मुलीचा जीव सुखरूप वाचला.

व्यसन आणि गुन्हेगारीचा दुष्टसाखळी जाळं मिलिंद उर्फ सुर्या बघेल (वय २९, रा. बुटीबोरी), याचं नाव पोलिसांच्या गुन्हे नोंदवहीत आधीच नोंदलेलं होतं – खून, धमकी, जबरदस्तीचे प्रकार यांसारख्या गंभीर आरोपांनी त्याची पार्श्वभूमी अधिक काळी होती. मात्र, व्यसनाधीनता आणि आर्थिक विवंचना यांच्या दाट छायेत त्याने या वेळी अत्यंत निर्घृण मार्ग स्वीकारला – एका निष्पाप मुलीचं अपहरण.

गर्दीच्या ठिकाणी घडलेलं अपहरण रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पीडित मुलगी आई आणि भावासोबत ट्रुप्ती हॉटेलसमोर बसची वाट पाहत होती. गर्दीचा फायदा घेत बघेलने मुलीला उचललं आणि आईला फोन करून २०,००० रुपये खंडणीची मागणी केली. तसंच पोलिसांत तक्रार केल्यास मुलीला ठार मारण्याची धमकीही दिली.

पोलिसांची शिताफी आणि वेगवान कारवाई आईने संयम राखत बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. वरिष्ठ निरीक्षक मुकुंद कवडे यांनी तातडीने तीन पथकं तयार करून आरोपीच्या मागावर लावली. पोलिसांनी सुरक्षेचा आव आणत आरोपीला फोनवर वाटाघाटी करत डोंगरगावजवळ भेटीचं ठिकाण ठरवलं. मात्र, बघेलने आपला फोन बंद केला.

त्याचा मोबाईल ट्रॅक करून पोलिसांनी बुटीबोरी परिसरात त्याला शोधून काढलं. एकाच तासाच्या आत मुलीची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आलं. ज्यांनी जिवात जीव टाकला: 'ते' पोलीस ही फक्त एक केस नव्हती. ही होती वेळेवरच्या कृतीची, संयम आणि रणनीतीची कसोटी. पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, उपायुक्त रश्मिता राव आणि त्यांच्या चमूने दाखवलेली तत्परता कौतुकास्पद ठरते.