सार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) आज १३ मे रोजी १०वीचा निकाल जाहीर करणार आहे. १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, निकाल हा केवळ आकड्यांची गोष्ट नसून विद्यार्थी, पालक आणि स्पर्धेच्या चाहुलीचा संगम आहे

"निकाल कधी लागणार?" कारण आज म्हणजेच १३ मे रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) इयत्ता १०वी (SSC) परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे. मात्र, निकाल ही केवळ आकड्यांची गोष्ट नसून विद्यार्थ्यांच्या मनातील असंख्य अपेक्षा, पालकांच्या चिंतेचे ओझे आणि पुढच्या टप्प्यावर होणाऱ्या स्पर्धेची चाहूल यांची नोंद घेण्याची वेळ आहे. निकाल म्हणजे सगळं काही नाही

वाढत्या स्पर्धात्मक युगात निकालावरून विद्यार्थ्यांची किंमत मोजली जाते, हे वास्तव असूनही शैक्षणिक क्षेत्रातील अनेक जाणकार याला बदलाची गरज असल्याचं स्पष्टपणे सांगत आहेत. मानसशास्त्रज्ञ, शिक्षक संघटना आणि शिक्षणतज्ज्ञ एकमुखाने सांगतात की, निकाल म्हणजे एखाद्या टप्प्याचं मूल्यांकन, संपूर्ण व्यक्तिमत्वाचं नाही. डिजिटल युगातील निकाल

दुपारी १ वाजता mahresult.nic.in, mahahsscboard.in आणि digilocker.gov.in या वेबसाइट्सवर निकाल जाहीर होईल. यंदा जवळपास १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी मंडळाने विविध पोर्टल्सवर व्यवस्था केली आहे. पालकांची भूमिका निर्णायक

निकालाच्या दिवशी अनेकदा विद्यार्थ्यांपेक्षा पालकांमध्ये अधिक तणाव असतो. काही पालक आपल्या मुलांवर अपेक्षांचं ओझं टाकतात, तर काहीजण अपयश आल्यास भावनिक आधार देतात. शिक्षणतज्ज्ञ डॉ. शरद देशमुख यांच्या मते, "निकालाचं स्वागत समाधानाने करावं आणि पुढील वाटचालीसाठी योग्य निर्णय घ्यावेत." पुढील टप्प्यावर फोकस

निकालानंतर विद्यार्थी कोणत्या शाखेत जायचं, कोणता अभ्यासक्रम घ्यायचा यावर विचार करतील. हे निवडीचे क्षण आहेत. केवळ गुण पाहून नाही, तर स्वतःच्या आवडीनिवडी, कौशल्यं आणि भविष्यातील उद्दिष्टं लक्षात घेऊन पुढील टप्प्याची निवड करणं आवश्यक आहे.