Akshaya Tritiya 2025 : ज्योतिष आणि धर्मशास्त्रांमध्ये अक्षय्य तृतीयेला खूप शुभ तिथी मानलं जातं. पण या दिवशी काही गोष्टी चुकूनही खरेदी करू नयेत. असं केल्याने अशुभ फळ मिळण्याची शक्यता असते. 

Akshaya Tritiya 2025 : यंदा अक्षय्य तृतीयेचा सण 30 एप्रिल, बुधवारी साजरा केला जाईल. ज्योतिषशास्त्र आणि धर्मग्रंथांमध्ये या सणाला खूप शुभ मानलं जातं. याला अबूझ मुहूर्त असंही म्हणतात म्हणजेच या दिवशी कोणतंही शुभ काम मुहूर्त न पाहताही करता येतं. अक्षय तृतीयेला खरेदीचा महामुहूर्त असंही म्हणतात, म्हणूनच या दिवशी बाजारात खरेदीदारांची गर्दी उसळते. अक्षय तृतीयेला जरी सर्व गोष्टी खरेदी करता येत असल्या, तरी खरेदी करताना काही गोष्टींचं लक्षात ठेवायला हवं. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्या मते, अक्षय तृतीयेला ५ गोष्टी चुकूनही खरेदी करू नयेत, असं केल्याने अशुभ फळ मिळण्याची शक्यता असते. पुढे जाणून घ्या कोणत्या आहेत या ५ गोष्टी…

लोखंडी सामान चुकूनही खरेदी करू नका

अक्षय्य तृतीयेला लोखंडी सामान चुकूनही खरेदी करू नये कारण लोखंड हे शनीची धातू आहे. शुभ प्रसंगी लोखंडाच्या वस्तू खरेदी करणं अशुभ मानलं जातं. अक्षय्य तृतीयेला खरेदी केलेल्या लोखंडाच्या वस्तू एखाद्या घटना-दुर्घटनेचं कारणही बनू शकतात. म्हणूनच या दिवशी या धातूपासून बनलेल्या वस्तू खरेदी करण्यापासून बचा.

युझ अँड थ्रो वस्तू

आजकाल बाजारात अशा अनेक वस्तू आल्या आहेत ज्या एकदा वापरल्यानंतर काहीच कामाच्या राहत नाहीत आणि त्या फेकून दिल्या जातात. अक्षय्य तृतीयेला अशा वस्तूही खरेदी करू नयेत. अक्षय्य तृतीयेला अशा वस्तू खरेदी करा ज्या दीर्घकाळ वापरात राहतील. वापरा आणि फेका वस्तू घराच्या सुख-समृद्धीसाठी चांगल्या मानल्या जात नाहीत.

अ‍ॅल्युमिनियमच्या वस्तूही घेऊ नका

धर्मग्रंथांमध्ये अ‍ॅल्युमिनियमला अशुद्ध धातू मानलं जातं, म्हणूनच यापासून बनलेल्या वस्तूंचा वापर पूजा-पाठ इत्यादी कोणत्याही शुभ कार्यात केला जात नाही. अक्षय्य तृतीयेसारख्या शुभ प्रसंगी अ‍ॅल्युमिनियमपासून बनलेल्या वस्तू खरेदी करू नका, यामुळे घराची सुख-समृद्धी नष्ट होण्याची भीती असते.

काचेच्या वस्तू

काही लोक अक्षय्य तृतीयेला शो-पीस म्हणून काचेच्या वस्तू खरेदी करून घरी आणतात. असं करणं योग्य नाही कारण काच राहूशी जोडलं जातं जे आपल्या मानसिक ताणतणावाचं कारणही बनू शकतं. म्हणूनच अक्षय्य तृतीयेला काचेच्या वस्तू खरेदी करणे टाळा.

धारदार वस्तू 

अक्षय्य तृतीयेला कोणत्याही धारदार वस्तू जसे की चाकू, कात्री, ब्लेड इत्यादी आणि टोकदार वस्तू जसे की सुई इत्यादी खरेदी करू नयेत. या वस्तू आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम करतात आणि घरात अशांती पसरवतात. म्हणूनच अक्षय्य तृतीयेला या वस्तू चुकूनही घरी आणू नका.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)