पंतप्रधान मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. ऑपरेशन सिंधूर, भारत-पाकिस्तान युद्धबंदी, आर्थिक विकास यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर ते भाषण करणार असल्याची अपेक्षा आहे.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. यामुळे देशभरात उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्याच्या भू-राजकीय आणि आर्थिक परिस्थिती पाहता, त्यांच्या भाषणाच्या विषयाबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

YouTube video player

ऑपरेशन सिंदूर:

पंतप्रधानांचे भाषण अलीकडील महत्त्वाच्या घटनांशी संबंधित असेल अशी अपेक्षा आहे. विशेषतः, भारतीय सैन्याचे "ऑपरेशन सिंदूर" आणि भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी कराराबाबत ते बोलतील असे म्हटले जात आहे. पंतप्रधानांच्या भाषणाचा हा मुख्य मुद्दा असेल अशी अपेक्षा आहे.

संसदेचे विशेष अधिवेशन:

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी पक्षनेत्यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर कारवाईसह भारताच्या प्रत्युत्तरावर चर्चा करण्याची विरोधी पक्षांची मागणी आहे.

ऑपरेशन सिंदूर कारवाईबाबत लष्करी अधिकारी दररोज पत्रकार परिषद घेऊन माहिती देत होते. या पार्श्वभूमीवर, युद्धबंदी झाल्यानंतर भारताचे पुढील पाऊल काय असेल याची उत्सुकता आहे.

पाकिस्तानविरुद्ध भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तराबाबत पंतप्रधान मोदींनी अद्याप सार्वजनिकपणे भाष्य केलेले नाही. त्यामुळे हे पहिलेच भाषण सर्वांच्या नजरेत असेल. हे भाषण प्रमुख वृत्तवाहिन्या आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर थेट प्रसारित केले जाणार आहे.