भारत सरकारच्या सूचनेनंतर उत्तर आणि पश्चिम भारतातील २० विमानतळांवरील नागरी उड्डाणे १० मे सकाळी ५:२९ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहेत.
नवी दिल्ली - भारत सरकारच्या सूचनेनंतर उत्तर आणि पश्चिम भारतातील २० विमानतळांवरील नागरी उड्डाणे १० मे सकाळी ५:२९ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहेत. ही कारवाई पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) दहशतवादी अड्ड्यांवर भारतीय हवाई दलाने केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे.
बंद असलेले विमानतळ:
लेह, श्रीनगर, जम्मू, अमृतसर, पठाणकोट, चंदीगड, जोधपूर, जैसलमेर, जामनगर, भटिंडा, भुज, धर्मशाळा, शिमला, राजकोट, पोरबंदर, बीकानेर, हिंडन, किशनगढ, कांडला आणि ग्वाल्हेर.
एअरलाईन्सच्या घोषणा:
इंडिगो:
सरकारच्या नोटिफिकेशननंतर १६५ हून अधिक उड्डाणे रद्द. प्रवाशांना पूर्ण परतावा किंवा विनाशुल्क रिअबुकिंगची सुविधा दिली आहे.
एअर इंडिया:
जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट येथील उड्डाणे १० मेपर्यंत रद्द. प्रवाशांना एकदाच रिअबुकिंग किंवा पूर्ण परताव्याचा पर्याय.
एअर इंडिया एक्सप्रेस:
अमृतसर, ग्वाल्हेर, जम्मू, श्रीनगर आणि हिंडन येथील उड्डाणांवर रद्द किंवा मोफत रिअबुकिंगची सुविधा.
स्पाईसजेट:
धर्मशाळा, लेह, जम्मू, श्रीनगर आणि अमृतसरसह उत्तर भारतातील उड्डाणांवर परिणाम; पुढील सूचना येईपर्यंत सेवा स्थगित.
परदेशी एअरलाईन्सनी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र टाळले
२६ एप्रिलपासून पाकिस्तानने भारतीय उड्डाणांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. त्यानंतर ६ मेपासून बहुतेक परदेशी विमान कंपन्यांनी देखील पाकिस्तानवरून उड्डाण करणे थांबवले आहे.
सिंगापूर एअरलाईन्स व स्कूट:
पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राऐवजी पर्यायी मार्गांचा वापर; त्यामुळे काही उड्डाणांमध्ये वेळ वाढणार.
KLM (नेदरलँड्स):
अॅमस्टरडॅम–दिल्ली फ्लाइट १ तास तर अॅमस्टरडॅम–मुंबई फ्लाइट १ तास १५ मिनिटांनी जास्त वेळ घेणार.
युनायटेड एअरलाईन्स (USA):
न्यूयॉर्क–दिल्ली उड्डाण रद्द; पुढील स्थितीवर लक्ष ठेवून निर्णय घेतला जाईल.