अहमदाबादजवळ झालेल्या विमान अपघातात नाशिकच्या पवार दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. लंडनमध्ये मुलाला भेटण्यासाठी निघालेल्या या दाम्पत्याचा प्रवास अपघातात संपला.

गुजरात | प्रतिनिधी – गुजरातच्या अहमदाबादजवळ शनिवारी घडलेल्या भीषण विमान अपघातात नाशिक येथील आशा पवार आणि महादेव पवार या दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे दोघंही एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाने लंडनला त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी निघाले होते, मात्र नियतीने वेगळाच खेळ मांडला.

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडिया एक्सप्रेसचे हे खासगी चार्टर्ड विमान टेकऑफनंतर काही मिनिटांतच तांत्रिक बिघाडामुळे कोसळले. या अपघातात एक प्रवासी सोडून सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये नाशिकचे पवार दाम्पत्यही असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी ही बातमी ऐकताच शोककळा पसरली आहे.

पवार कुटुंबीयांचे मुलं लंडनमध्ये वास्तव्यास असून अनेक वर्षांनंतर आई-वडिलांनी त्याला भेटण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नियतीने त्यांच्या या स्वप्नांनाच विराम दिला. अपघातानंतर घटनास्थळी बचावकार्य हाती घेण्यात आलं असून ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे. अपघाताचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी DGCA व अन्य यंत्रणा तपास करत आहेत.