आरसीबी संघाच्या विजयाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन 11 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. कब्बन पार्क आणि विधानसौध मेट्रो स्थानकांवर गर्दी झाल्याने मेट्रो थांबणार नाही.
बंगळुरू : आरसीबी संघाच्या आयपीएल विजयाच्या जल्लोषावर शोककळा पसरली आहे. कोणतीही पूर्वतयारी न करता आयोजित केलेल्या कार्यक्रमात हजारो आरसीबी चाहते सहभागी झाल्याने मोठी चेंगराचेंगरी झाली आणि ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
कब्बन पार्क आणि डॉ. बी.आर. आंबेडकर विधानसौध मेट्रो स्थानकांवर अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाली आहे. मेट्रो स्थानकातही चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असल्याने कब्बन पार्क आणि विधानसौध स्थानकांवर मेट्रो थांबवू नये, असा निर्णय बीएमआरसीएलने घेतला आहे.
याबाबत बीएमआरसीएलने प्रसिद्धीपत्रक जारी करून, 'आरसीबी संघाच्या अभिनंदन कार्यक्रमासाठी मेट्रो सेवेत बदल करण्यात आला आहे. विधानसौध आणि चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाच्या अभिनंदन सोहळ्याला मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे बंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (बीएमआरसीएल) ने आज संध्याकाळी ४:३० पासून कब्बन पार्क आणि डॉ. बी.आर. आंबेडकर विधानसौध स्थानकांवर पुढील सूचना येईपर्यंत मेट्रो थांबणार नाही, अशी घोषणा केली आहे.
त्यानुसार या स्थानकांवर टोकन आणि क्यूआर तिकीट वितरण सेवा तात्पुरते बंद करण्यात आल्या आहेत. सर्व प्रवाशांनी या तात्पुरत्या बदलांची नोंद घ्यावी आणि सुलभ प्रवासासाठी मेट्रो कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे बीएमआरसीएलने आवाहन केले आहे. प्रवाशांनी त्यांचा प्रवास त्यानुसार नियोजित करावा आणि त्यांच्या प्रवासाच्या गरजांसाठी पर्यायी मेट्रो स्थानके वापरावीत, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.